मिलिंद बोकील
शाळा नंतर मिलिंद बोकिलांची वाचावयास घेतलेली दुसरी
कादंबरी. आयुष्याच्या मध्यावर पोचलेल्या एका सुखी जोडप्याच्या मनात एका
विशिष्ठ घटनेवरून उठलेला तरंग म्हणजे समुद्र. समुद्रा शेजारी २ -४ दिवस
घालवायला गेलेली ही दोघे जण.
नवरा म्हणून, बायको म्हणून तसेच पुरुष
म्हणून आणि स्त्री म्हणून त्यांचे विचार, भावना, त्याचे हिंदोळे आणि
एकंदरच भावबंध पुस्तकात उत्तम पणे मांडले आहेत. काही पटले नाही तरी पुस्तक
बाजूला ठेववत नाही तर त्यावर विचार करायला परावृत्त होतो आपण. पुस्तकाने
पकड आणि वेग छान राखला आहे.
Labels: पुस्तके |
Post a Comment