पु. ल. देशपांडे
पूर्ण पुस्तकच विडंबनात्मक आहे. सगळेच संदर्भ माहित नसले तरीही पुलंच्या शैलीमुळे पुस्तकाचा आनंद मिळाला. कोटी करण्या मधे तर पुल महान आहेतच. आपण विडंबनात्मक वाचत आहोत हि जाणीव प्रत्येक वाक्यात आहे आणि त्यामुळे चेहऱ्यावरचे स्मित कायम राहते. अज्ञानी माणसाने आपला मोठेपणा दाखवण्यासाठी इतिहास लिहिला तर तो कसा लिहिल हे पुलंनी त्या भूमिकेत पुरेपूर उतरून दाखवले आहे. उदाहरणार्थ : किर्तन किंवा भारूडांचे प्रोग्राम आटपून यायला रात्रीचा उशीर झाला [एकनाथांना] तर [बायको] वाड्याचे दार उघडायला सुद्धा येत नसे. "बया दार उघड" हे प्रसिद्ध गीत ह्या अनुभूतीतूनच आकारले असावे
Labels: पुस्तके |
Post a Comment