संपादक
पद्मजा फाटक
दीपा गोवारीकर
विद्या विद्वांस
धोपट मार्ग सोडून आहे ना विषय?
खरे तर असले पुस्तक मी वाचायला घेतले असते का शंकाच आहे. पण मला कोणी
आवर्जून वाचायला सांगितले आणि खूप नवीन असं काही वाचल्याचा आनंद मिळाला.
'शुभारंभ' मधेच संपादकांनी त्यांचा हा न-स्पर्शलेला, कमी महत्व दिला गेलला
विषय निवडण्याचा उद्देश, त्याची कारणे, त्यामागचा विचार, कसे करायचे यावर विचार करून ठरवलेली पद्धत, संपादनातील अडचणी, परिश्रम, अपेक्षा, फल-निष्पत्ती आणि मर्यादा या सर्वांचे उत्तम विवेचन केले आहे. यामुळे वाचताना एक दिशा मिळाली.
लेख लिहिणारे जरी प्रतिथ-यश लोक असले तरी बरेचसे मला माहीतच नव्हते. (अर्थात हा माझा दोष)
पण तरी मानवी संबंधातील तेही वडील आणि मुलगी यांच्या नात्यामधील कंगोरे वाचताना ती व्यक्ती माहित नसल्याचा काही परिणाम झाला नाही.
अनुभव विश्व समृद्ध झाले.
अशा वाचनामुळेच आपली विचार क्षमता सुदृढ होण्यास मदत होत असेल ना?
हे संपादन २००४ मधील आहे, आत्ता बदलत्या काळात हे संपादन केले गेले तर मला नक्की वाचायला आवडेल.
Labels: पुस्तके |